Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर बस पुलाखाली कोसळल्याने मोठा अपघात

जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात(bus accident) झाला. यामुळे पूलावरून खाली कोसळली.


या बसच्या अपघाात २५ प्रवासी जखमी झाले तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली ही बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जात होती.


यावेळी बदनापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला पुलावरून कोसळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.


अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील २९ प्रवाशांपैकी ४ जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी' कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर

- हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने मुंबई : गेल्या दोन

चेन्नईत बीचवर अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री तामिळनाडू सरकारच्या संपर्कात

मुंबई : चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत

Solapur Crime: हातावर सुसाईट नोट लिहत विवाहितेने संपवलं आयुष्य; सोलापुरातील नातेपुते शहरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे... ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या

Pune: पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं पितळ उघड

पुणे: पुण्याच्या गजबजलेल्या बुधवार पेठेत गेल्या २० वर्षांपासून बाबू भैय्या हे नाव अत्यंत दबदब्यानं घेतलं जातं.