नवी दिल्ली : भारताकडून सातत्याने होत असलेल्या दबावानंतर आता परदेशातील खालिस्तानी दहशतवाद्यांची(khalistani terrorist) आता काही खैर नाही. या सर्व दहशतवाद्यांना तपास विभागाची( भीती सतावत आहे. कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेत साधारण ३० असे खालिस्तानी दहशतवादी आहे. आता हे दहशतवादी तपास विभागाच्या रडावर आहेत.
या देशांच्या तपास विभागाकडून आता या दहशतवाद्यांच्या केवळ ठिकाण्यावरच धाड पडणार नाही आहे तर त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण माहिती मिळवली जात आहे.
खरंतर, सामाजिक संस्थांच्या नावावर हे कार्यक्रम सुरू असतात आणि त्यांच्या आडून हे दहशतवादी आपले अजेंडे पूर्ण करत असतात. आपल्या संस्थेच्या आड ते ड्रग तस्करी आणि गँगवार सारखे कार्यक्रम करत आहेत
या देशांनी आपल्या स्तरावर आपल्या तपास विभागाकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येणाऱ्या दिवसांत भारतीय तपास विभागाकडून हा प्रयत्न असणार आहे की विविध देशांशी संबंधित तपास एजन्सीद्वारे या खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत अधिक माहिती मिळवली जाईल.
कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियामध्य १८ जूनला हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात भारत आणि कॅनडा यांच्यात राजन्यायिक विवादादरम्यान ही खबर आली आहे. एक दिवस आधी राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणने सिख्स फॉर जस्टिसचे प्रमुख तसेच खलिस्तानी दहशवादी गुरपतवंत सिंह पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमध्ये एक बंगला आणि भूखंडासह अचल संपत्तीवर शनिवारी जप्त केली.
एआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की ही कारवाई कॅनडासह विविध देशांमध्ये संचालित होणाऱ्या दहशतवादी आणि अलगाववादी नेटवर्कवर देशाच्या कारवाईला मजबूती मिळेल. मोहालीच्या एसएस नगर स्थित एएनआयच्या विशेष न्यायालयाकडून या जप्तीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…