G-20 Summit : भारताचे जी-२० अध्यक्षपद आव्हानात्मक होते - परराष्ट्र मंत्री

indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. यामागे पूर्व-पश्चिम ध्रुवीकरण आणि उत्तर-दक्षिण विभाजनामुळे झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साऊथ: डिलीव्हरिंग फॉर डेव्हलपमेंटमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षता आणि नवी दिल्लीत आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेबाबत विधान केले.


परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून ही बाब सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध होता की परिषद आपल्या मूळ अजेंड्यावर कायम राहील. न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, तुमची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्हाला भारताबद्दल काय वाटते त्याच भावना व्यक्त करतात. आपण नवी दिल्लीत झालेल्या जी-२० बैठकीच्या काही आठवड्यानंतर भेटत आहोत. ही परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवर झाले होते.



अजेंड्यावर परतणे गरजेचे


जयशंकर पुढे म्हणाले, जी-२०हे एक आव्हानात्मक शिखर परिषद होती. असे यासाठी म्हणत आहोत कारण आम्हाला पूर्व-पश्चिम ध्रुवीकरणासह उत्तर-दक्षिण विभाजनाचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्र्यांनी जोर देत म्हटले की भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेतील मूळ अजेंडा जागतिक वाढ आणि विकास हे राहिले आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व