indनवी दिल्ली: भारतात नुकतीच पार पडलेली जी-२० परिषद(g-20 summit) ही आव्हानात्मक होती असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. यामागे पूर्व-पश्चिम ध्रुवीकरण आणि उत्तर-दक्षिण विभाजनामुळे झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साऊथ: डिलीव्हरिंग फॉर डेव्हलपमेंटमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या जी-२० अध्यक्षता आणि नवी दिल्लीत आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेबाबत विधान केले.
परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून ही बाब सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध होता की परिषद आपल्या मूळ अजेंड्यावर कायम राहील. न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांना संबोधित करताना जयशंकर म्हणाले, तुमची उपस्थिती आमच्यासाठी नक्कीच गरजेची आहे. तुम्हाला भारताबद्दल काय वाटते त्याच भावना व्यक्त करतात. आपण नवी दिल्लीत झालेल्या जी-२० बैठकीच्या काही आठवड्यानंतर भेटत आहोत. ही परिषद एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवर झाले होते.
जयशंकर पुढे म्हणाले, जी-२०हे एक आव्हानात्मक शिखर परिषद होती. असे यासाठी म्हणत आहोत कारण आम्हाला पूर्व-पश्चिम ध्रुवीकरणासह उत्तर-दक्षिण विभाजनाचा सामना करावा लागला. परराष्ट्र मंत्र्यांनी जोर देत म्हटले की भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेतील मूळ अजेंडा जागतिक वाढ आणि विकास हे राहिले आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…