Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे : सातत्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठी नवी योजना आखली आहे. या नव्या योजनेमुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच प्रवासही आणखी वेगवान होणार आहे.


दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. हा महामार्ग सध्या सहा पदरी आहे. मात्र इतके असतानाही या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तीन तासाच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास घालवावे लागतात.


यावर उपाय म्हणून सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे.


देशातील सर्वात पहिला महामार्ग अशी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची ओळख आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारे अंतर या महामार्गामुळे कमी करण्यात आले. मात्र वाढती वाहनसंख्या तसेच येथून प्रवास करणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून दररोज ८० हजारापेक्षा अधिक वाहने धावतात.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि