Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे : सातत्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठी नवी योजना आखली आहे. या नव्या योजनेमुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच प्रवासही आणखी वेगवान होणार आहे.


दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. हा महामार्ग सध्या सहा पदरी आहे. मात्र इतके असतानाही या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तीन तासाच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास घालवावे लागतात.


यावर उपाय म्हणून सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे.


देशातील सर्वात पहिला महामार्ग अशी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची ओळख आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारे अंतर या महामार्गामुळे कमी करण्यात आले. मात्र वाढती वाहनसंख्या तसेच येथून प्रवास करणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून दररोज ८० हजारापेक्षा अधिक वाहने धावतात.

Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)