India Canada: भारत आणि कॅनडा वादामध्ये उद्योजक आनंद महिंद्रांची उडी...

  110

भारत आणि कॅनडामध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती कंपनीने आज भारतीय शेअर बाजाराला दिली.


महिंद्रा अँड महिंद्राची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये ११.१८ टक्के भागीदारी आहे. कंपनीने स्वेच्छेनं कंपनीचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली. रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर रोजी सर्टिफिकेट ऑफ डिझॉल्युशन मिळाले आहे, अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. लिक्विडेशन नंतर, कंपनीला अंदाजे २८.७ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा  ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून आवश्यक कागदपत्रे मिळाली होती, ज्याची माहिती कंपनीला कळवण्यात आली होती. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून ती कंपनीची सहयोगी नाही.


शेअर मार्केटमध्ये खळबळ...                                                                                                  या बातमीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटे आधी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 1584 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, व्यवहाराच्या सत्रात कंपनीचे शेअर साडेतीन टक्क्यांनी घसरले आणि दिवसभरातील 1575.75 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचले. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1634.05 रुपयांवर बंद झाले होते.


दुसरीकडे, कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात 7200 कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1634.05 रुपये होता आणि कंपनीचे मार्केट कॅप 2,03,025.78 कोटी रुपये होते. आज जेव्हा कंपनीचे शेअर्स 1575.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपये झाले. अशा स्थितीत कंपनीच्या मूल्यांकनाला 7,243.6 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत