Asian games: छेत्रीची कमाल, एशियन गेम्समध्ये दमदार कमबॅक...

  167

 भारताचा बांगलादेशवर थरारक विजय 


कर्णधार सुनील छेत्रीच्या एकमेव गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाने शेजारील बांगलादेशवर १-० असा थरारक विजय मिळवत एशियन गेम्समध्ये विजयाचे खाते उघडले. याआधी भारताला चीनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र बांगलादेशविरुद्ध दमदार विजय मिळवत भारताने जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा होता. यामध्ये भारताने बाजी मारली.


भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना सुरुवातीच्या हाफमध्ये गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली परंतु त्याचे रुपांतर गोलमध्ये करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावतही गोल होण्याची शक्यता दिसत नव्हती. सामना गोलविना बरोबरीत सुटण्याच्या दिशेने चालला आहे. मात्र सामन्याच्या ८५व्या मिनिटाला अखेर ही कोंडी सुटली. भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीने गोल करत भारतीय संघाच्या गोलचे खाते उघडले. त्यावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. एका गोलमुळे भारतीय संघाने विजय मिळवला.


भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. सुनिल छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत पहिला विजय मिळवलाय. याआधी चीनविरोधात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण बांगलादेशविरोधात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत स्पर्धेत कमबॅक केले आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १-० च्या फराकाने पराभव केलाय. भारतासाठी कर्णधार सुनिल छेत्री याने अखेरच्या क्षणी गोल केला. या गोलच्या बळावरच भारताने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 85व्या मिनिटाला केला. भारतीय संघाला चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी बांगलादेशचा म्यानमारविरुद्ध पराभव झाला होता.


भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला.


पहिल्या हाफमध्ये काय झाले...                                                                                          संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या 20 षटकांमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील

PM Modi Award List : ११ वर्षांत २५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी

अमरनाथ यात्रा मार्गावर भीषण अपघात: ५ बस एकमेकांवर आदळल्या, ३६ यात्रेकरू जखमी!

जम्मू: अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांवर आज दुर्दैवी प्रसंग ओढवला. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन

Grand Chess Tour 2025 : गुकेशची कमाल! कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं अन् गुकेशनं त्याच्याचं नाकावर टिच्चून 'रॅपिड' स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं

नवी दिल्ली : क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान विश्वविजेता