Asian games: छेत्रीची कमाल, एशियन गेम्समध्ये दमदार कमबॅक…

Share

 भारताचा बांगलादेशवर थरारक विजय 

कर्णधार सुनील छेत्रीच्या एकमेव गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाने शेजारील बांगलादेशवर १-० असा थरारक विजय मिळवत एशियन गेम्समध्ये विजयाचे खाते उघडले. याआधी भारताला चीनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र बांगलादेशविरुद्ध दमदार विजय मिळवत भारताने जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा होता. यामध्ये भारताने बाजी मारली.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना सुरुवातीच्या हाफमध्ये गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली परंतु त्याचे रुपांतर गोलमध्ये करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावतही गोल होण्याची शक्यता दिसत नव्हती. सामना गोलविना बरोबरीत सुटण्याच्या दिशेने चालला आहे. मात्र सामन्याच्या ८५व्या मिनिटाला अखेर ही कोंडी सुटली. भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीने गोल करत भारतीय संघाच्या गोलचे खाते उघडले. त्यावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. एका गोलमुळे भारतीय संघाने विजय मिळवला.

भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. सुनिल छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत पहिला विजय मिळवलाय. याआधी चीनविरोधात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण बांगलादेशविरोधात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत स्पर्धेत कमबॅक केले आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १-० च्या फराकाने पराभव केलाय. भारतासाठी कर्णधार सुनिल छेत्री याने अखेरच्या क्षणी गोल केला. या गोलच्या बळावरच भारताने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 85व्या मिनिटाला केला. भारतीय संघाला चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी बांगलादेशचा म्यानमारविरुद्ध पराभव झाला होता.

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला.

पहिल्या हाफमध्ये काय झाले…                                                                                          संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या 20 षटकांमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

16 minutes ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

40 minutes ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

46 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

1 hour ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

2 hours ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 hours ago