Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, या बंदला स्थानिक व्यापा-यांनी पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवले आहे.


शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.


दरम्यान, काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाला असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुदर्शन देवराये या तरुणाने अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गावात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र, आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने सुदर्शने हताश होऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे.


या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली. तर, मोर्चा देखील काढण्यात आला. दरम्यान याचवेळी काही तरुणांनी टायर देखील पेटवून दिला होता. तर काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्यात असल्याचे समजते. मात्र, सध्या शहरात पूर्णपणे शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, कोणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागून घेतल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, याचवेळी जरांगे यांनी राज्यात कुठेच उग्र आणि हिंसक आंदोलन करु नये असे आवाहन केले आहे. सोबतच शासकीय मालमत्तेचे नुकसान होईल असे पाऊल उचलू नका, असेही म्हटले आहे.

Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची