घरातून केले अपहरण, डोक्यात मारली गोळी, मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या

इंफाळ: अज्ञात व्यक्तींनी भारतीय लष्करातील एक जवान शिपाई सर्टो थांगथांग कोम यांचे अपहरण करत त्यांची हत्या केली. शिपाई थांगथांग हे सुट्टीवर होते त्यांचे तरूंग, नेइकानलोंग, हॅपी व्हॅली, इंफाळ पश्चिम येथून अपहरण करण्यात आले होते. त्यांना मणिपूरच्या लीमाखोंग मिलिट्री स्टेशनवर तैनात करण्यात आले होते.



सकाळी १० वाजता केले अपहरण


१६ सप्टेंबर २०२३ला सकाळी १० वाजण्याच्या सुमाराह शिपाई सर्टो यांचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. त्यांचा १० वर्षांच्या मुलाने ही सर्व घटना पाहिली. मुलाने सांगितले की तीन व्यक्ती त्यांच्या घरात आल्या. त्यावेळेस वडील आणि मुलगा वऱ्हांड्यात काम करत होते. त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर पिस्तुल ठेवली आणि त्यांना जबरदस्ती सफेद गाडीत बसवले आणि आपल्यासोबत घेऊन गेले.



डोक्यात गोळी मारून केली हत्या


१७ सप्टेंबरला सकाळी या जवानाची काहीच खबर मिळाली नाही. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृतदेह इंफाळ पूर्वच्या सोगोलमांग पोलीस ठाण्यांतर्गत मोंगजामच्या पूर्व खुनिंगथेक गावात आढळला. त्यांच्या बहीण-भावाने ओळख पटवली.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात