Aurangabad and Usmanabad : 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' या नावांवर आता शिक्कामोर्तब

विभाग, उपविभाग, तालुका, गाव या सर्वच पातळींवर बदल


मुंबई : राज्यात जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. मात्र, राज्यातील दोन शहरे औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने (State Government) या दोन शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला काही प्रमाणात विरोध झाला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने याबद्दल काल रात्री नोटिफिकेशन काढलं आहे.


नामंतरासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अनेक आक्षेप आले होते. त्या आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नामांतर फक्त शहरापुरतं झालं आहे, जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. मात्र, काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' असं केलं आहे.


सरकारने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, औरंगाबाद जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर उस्मानाबाद जिल्हा आता धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाईल. याचसोबत औरंगाबाद विभाग, उपविभाग, तालुका, गाव छत्रपती संभाजीनगर विभाग, उपविभाग, तालुका, गाव नावाने ओळखले जाणार आहे. हाच बदल उस्मानाबादच्या बाबतीतही धाराशिव या नावाने असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये