Nipah Virus: कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेज १७ सप्टेंबरपर्यंत बंद

  137

कोझिकोड: केरळ सरकारने निपाह व्हायरसचा (nipah virus) प्रसार रोखण्यासाठी कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेजमधील सुट्टी १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दोन दिवस आधीच राज्यात या घातक व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून कोझिकोड जिल्ह्यात आंगणवाडी, मदरशे, क्लासेस तसेच प्रोफेशनल कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


यातच राज्य सरकारने म्हटले की, निपाह व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी गरजेचे मोनोक्लोनल अँटीबॉडी राज्यात पोहोचली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्यात बैठक झाली होती आणि आता मोनोक्लोन अँटीबॉडी आली आहे.



निपाह व्हायरसला घाबरण्याची गरज नाही


मंत्र्यांनी याआधी राज्यात विधानसभेत म्हटले होते की लोकांनी कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या प्रकोपाबद्दल घाबरण्याची गरज नाही. मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत सावधानता बाळगली पाहिजे. त्यांनी विधानसभेत विधान केले की घाबरण्याची गरज नाही. सर्वांनी मिळून सावधानतेने याचा सामना करूया.



कोझिकोडमध्ये निपाहमुळे दोघांचा मृत्यू


निपाह व्हायरसमुळे कोझिकोडमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांना व्हायरसची लागण झाली आहे. राज्यात बुधवारी २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला या व्हायरसची लागण झाली. केरळमधील हे पाचवे प्रकरण आहे. तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यात नऊ वर्षाच्या मुलाची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा