Nipah Virus: कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेज १७ सप्टेंबरपर्यंत बंद

कोझिकोड: केरळ सरकारने निपाह व्हायरसचा (nipah virus) प्रसार रोखण्यासाठी कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेजमधील सुट्टी १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दोन दिवस आधीच राज्यात या घातक व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून कोझिकोड जिल्ह्यात आंगणवाडी, मदरशे, क्लासेस तसेच प्रोफेशनल कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


यातच राज्य सरकारने म्हटले की, निपाह व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी गरजेचे मोनोक्लोनल अँटीबॉडी राज्यात पोहोचली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्यात बैठक झाली होती आणि आता मोनोक्लोन अँटीबॉडी आली आहे.



निपाह व्हायरसला घाबरण्याची गरज नाही


मंत्र्यांनी याआधी राज्यात विधानसभेत म्हटले होते की लोकांनी कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या प्रकोपाबद्दल घाबरण्याची गरज नाही. मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत सावधानता बाळगली पाहिजे. त्यांनी विधानसभेत विधान केले की घाबरण्याची गरज नाही. सर्वांनी मिळून सावधानतेने याचा सामना करूया.



कोझिकोडमध्ये निपाहमुळे दोघांचा मृत्यू


निपाह व्हायरसमुळे कोझिकोडमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांना व्हायरसची लागण झाली आहे. राज्यात बुधवारी २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला या व्हायरसची लागण झाली. केरळमधील हे पाचवे प्रकरण आहे. तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यात नऊ वर्षाच्या मुलाची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन