PAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

  92

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलमध्ये १७ सप्टेंबरला टीम इंडियाची टक्कर श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये स्थान पटकावले. कुशल मेंडिसच्या अर्धशतकानंतर चरिथ असलंकाच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २ विकेट राखत हरवले.


आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे तसेच त्याने खराब कामगिरीबाबतही संघावर टीका केली.



श्रीलंकेच्या संघाची जबरदस्त कामगिरी


पाकिस्तानच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकाच्या मेंडिसने ८७ बॉलमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली आणि समरविक्रमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला.



या सामन्यातही पावसाचा व्यत्यय


पावसामुळे सामन्याला सुरूवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला. सामन्यात दोनदा पावसाने व्यत्यय आणला यामुळे षटकांची संख्या घटवून ४२ इतकी करण्यात आली. श्रीलंकेला डकवर्थ लुईस नियमानुसार २५२ धावांचे आव्हान मिळाले.



संघाच्या पराभवानंतर चिडला बाबर


आशिया चषकातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले, श्रीलंकेने वास्तवात चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला यामुळेच ते जिंकले. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग चांगली केली नाही. म्हणूनच आमचा पराभव झाला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र