PAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

  87

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलमध्ये १७ सप्टेंबरला टीम इंडियाची टक्कर श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये स्थान पटकावले. कुशल मेंडिसच्या अर्धशतकानंतर चरिथ असलंकाच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २ विकेट राखत हरवले.


आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे तसेच त्याने खराब कामगिरीबाबतही संघावर टीका केली.



श्रीलंकेच्या संघाची जबरदस्त कामगिरी


पाकिस्तानच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकाच्या मेंडिसने ८७ बॉलमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली आणि समरविक्रमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला.



या सामन्यातही पावसाचा व्यत्यय


पावसामुळे सामन्याला सुरूवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला. सामन्यात दोनदा पावसाने व्यत्यय आणला यामुळे षटकांची संख्या घटवून ४२ इतकी करण्यात आली. श्रीलंकेला डकवर्थ लुईस नियमानुसार २५२ धावांचे आव्हान मिळाले.



संघाच्या पराभवानंतर चिडला बाबर


आशिया चषकातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले, श्रीलंकेने वास्तवात चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला यामुळेच ते जिंकले. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग चांगली केली नाही. म्हणूनच आमचा पराभव झाला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार