PAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलमध्ये १७ सप्टेंबरला टीम इंडियाची टक्कर श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये स्थान पटकावले. कुशल मेंडिसच्या अर्धशतकानंतर चरिथ असलंकाच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २ विकेट राखत हरवले.


आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे तसेच त्याने खराब कामगिरीबाबतही संघावर टीका केली.



श्रीलंकेच्या संघाची जबरदस्त कामगिरी


पाकिस्तानच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकाच्या मेंडिसने ८७ बॉलमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली आणि समरविक्रमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला.



या सामन्यातही पावसाचा व्यत्यय


पावसामुळे सामन्याला सुरूवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला. सामन्यात दोनदा पावसाने व्यत्यय आणला यामुळे षटकांची संख्या घटवून ४२ इतकी करण्यात आली. श्रीलंकेला डकवर्थ लुईस नियमानुसार २५२ धावांचे आव्हान मिळाले.



संघाच्या पराभवानंतर चिडला बाबर


आशिया चषकातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले, श्रीलंकेने वास्तवात चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला यामुळेच ते जिंकले. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग चांगली केली नाही. म्हणूनच आमचा पराभव झाला.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट