PAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलमध्ये १७ सप्टेंबरला टीम इंडियाची टक्कर श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये स्थान पटकावले. कुशल मेंडिसच्या अर्धशतकानंतर चरिथ असलंकाच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २ विकेट राखत हरवले.


आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे तसेच त्याने खराब कामगिरीबाबतही संघावर टीका केली.



श्रीलंकेच्या संघाची जबरदस्त कामगिरी


पाकिस्तानच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकाच्या मेंडिसने ८७ बॉलमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली आणि समरविक्रमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला.



या सामन्यातही पावसाचा व्यत्यय


पावसामुळे सामन्याला सुरूवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला. सामन्यात दोनदा पावसाने व्यत्यय आणला यामुळे षटकांची संख्या घटवून ४२ इतकी करण्यात आली. श्रीलंकेला डकवर्थ लुईस नियमानुसार २५२ धावांचे आव्हान मिळाले.



संघाच्या पराभवानंतर चिडला बाबर


आशिया चषकातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले, श्रीलंकेने वास्तवात चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला यामुळेच ते जिंकले. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग चांगली केली नाही. म्हणूनच आमचा पराभव झाला.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स