One Nation, One Document : आता 'वन नेशन, वन डॉक्युमेंट' कायदा १ ऑक्टोबरपासून लागू होणार!

नवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'ची (One Nation, One Election) जोरदार चर्चा सुरु असतानाच आता 'वन नेशन, वन डॉक्युमेंट' (One Nation, One Document) ही योजना लागू होणार आहे. त्यानुसार, आता शाळेच्या अॅडमिशनपासून सरकारी कामांसाठी केवळ जन्म दाखला या एकाच कागदपत्राची गरज पडणार आहे. यासंदर्भातील जन्म आणि मृत्यू सुधारणा कायदा २०२३ येत्या १ ऑक्टोबरपासून देशभरात लागू होणार आहे.


शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश, वाहन परवाना, मतदार यादी, आधार क्रमांक, लग्नाची नोंदणी, सरकारी कामाची नियुक्ती तसेच इतर सर्व कामांसाठी केवळ जन्म दाखल्याचीच गरज असणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून हा नवा कायदा लागू होणार आहे.


केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत या संदर्भात घोषणा केली आहे. ज्यामध्ये १ ऑक्टोबरपासून कायद्याच्या तरतुदी लागू होतील. यामुळे नोंदणीकृत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाबेस तयार करण्यात मदत होईल. जन्म आणि मृत्यू दाखल्यामुळे अखेरीस सार्वजनिक सेवा आणि सामाजिक लाभ तसेच डिजिटल नोंदणीचे कार्यक्षम आणि पारदर्शक वितरण करता येईल.


"जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३' च्या कलम १च्या उप-कलम (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकार याद्वारे १ ऑक्टोबर २०२३ पासून या कायद्याच्या तरतुदी लागू होतील," असं अधिसूचनेत म्हटलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत गेल्या महिन्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२३ मंजूर करण्यात आले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी