Maratha Andolan : अखेर भेट झाली! आंदोलनाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात प्रत्यक्ष संवाद

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत जरांगे यांचं उपोषण मागे


जालना : मराठा समाजाचे गेल्या सोळा दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करत आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सरकारने यावर अनेक बैठका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, उपोषण सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. आज मुख्यमंत्री अंतरवाली सराटी गावात दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळेस मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, त्यांच्यातच धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे, असं जरांगे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; फडणवीसांकडून मोठी भेट, २५०० रोजगार निर्माण होणार

पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

Palghar: पालघरच्या ५० हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी मिळणार

पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक

अरबी समुद्रात वाऱ्यांनी बदलली दिशा, मार्च हीटचा चटका, पावसाबाबत काय अंदाज?

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात