PAK vs SL: पावसामुळे रद्द झाला पाकिस्तान-श्रीलंका सामना तर कोणाला मिळणार फायनलमध्ये संधी?

  96

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) गुरूवारी १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भिडतील. दोन्ही संघाचा सुपर ४मधील शेवटचा सामना आहे. मात्र हा सामना कोणत्याही सेमीफायनलपेक्षा कमी नाही. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.


श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनीही सुपर ४मध्ये दोन-दोन सामने खेळले आहेत. या दरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय मिळाला आहे आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच सामना जिंकणारा संघ ४ पॉईंटसह फायनलमध्ये जाईल.



पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर...


या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशातच सवाल हा आहे की जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचे उत्तर आहे श्रीलंका. जर पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर दसुन शनाकाचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेईल. श्रीलंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अशातच सामना रद्द होण्याच्या स्थितीत श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.



या सामन्यासाठी रिझर्व्ह डे नाही


पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. अशातच फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा खुलासा गुरूवारी होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर १७ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगेल.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार