PAK vs SL: पावसामुळे रद्द झाला पाकिस्तान-श्रीलंका सामना तर कोणाला मिळणार फायनलमध्ये संधी?

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) गुरूवारी १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भिडतील. दोन्ही संघाचा सुपर ४मधील शेवटचा सामना आहे. मात्र हा सामना कोणत्याही सेमीफायनलपेक्षा कमी नाही. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.


श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनीही सुपर ४मध्ये दोन-दोन सामने खेळले आहेत. या दरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय मिळाला आहे आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच सामना जिंकणारा संघ ४ पॉईंटसह फायनलमध्ये जाईल.



पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर...


या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशातच सवाल हा आहे की जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचे उत्तर आहे श्रीलंका. जर पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर दसुन शनाकाचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेईल. श्रीलंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अशातच सामना रद्द होण्याच्या स्थितीत श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.



या सामन्यासाठी रिझर्व्ह डे नाही


पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. अशातच फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा खुलासा गुरूवारी होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर १७ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगेल.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना