PAK vs SL: पावसामुळे रद्द झाला पाकिस्तान-श्रीलंका सामना तर कोणाला मिळणार फायनलमध्ये संधी?

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) गुरूवारी १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भिडतील. दोन्ही संघाचा सुपर ४मधील शेवटचा सामना आहे. मात्र हा सामना कोणत्याही सेमीफायनलपेक्षा कमी नाही. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.


श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनीही सुपर ४मध्ये दोन-दोन सामने खेळले आहेत. या दरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय मिळाला आहे आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच सामना जिंकणारा संघ ४ पॉईंटसह फायनलमध्ये जाईल.



पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर...


या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशातच सवाल हा आहे की जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचे उत्तर आहे श्रीलंका. जर पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर दसुन शनाकाचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेईल. श्रीलंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अशातच सामना रद्द होण्याच्या स्थितीत श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.



या सामन्यासाठी रिझर्व्ह डे नाही


पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. अशातच फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा खुलासा गुरूवारी होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर १७ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगेल.

Comments
Add Comment

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच