कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) गुरूवारी १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भिडतील. दोन्ही संघाचा सुपर ४मधील शेवटचा सामना आहे. मात्र हा सामना कोणत्याही सेमीफायनलपेक्षा कमी नाही. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनीही सुपर ४मध्ये दोन-दोन सामने खेळले आहेत. या दरम्यान दोन्ही संघांना प्रत्येकी एक विजय मिळाला आहे आणि प्रत्येकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशातच सामना जिंकणारा संघ ४ पॉईंटसह फायनलमध्ये जाईल.
या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशातच सवाल हा आहे की जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचे उत्तर आहे श्रीलंका. जर पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका सामना रद्द झाला तर दसुन शनाकाचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेईल. श्रीलंकेचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अशातच सामना रद्द होण्याच्या स्थितीत श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचेल.
पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवलेला नाही. अशातच फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा खुलासा गुरूवारी होईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर १७ सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगेल.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…