Eknath Shinde : मराठा समाजाला रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळणार

आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन


जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. यावेळेस मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, अशा भावना जरांगे यानी व्यक्त केल्या. तर मुख्यमंत्र्यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जरांगे, त्यांची टीम, त्यांच्या कुटुंबीयांना मी धन्यवाद देतो. जरांगे समाजासाठी लढत आहेत, यामध्ये त्यांचा वैयक्तिक फायदा नाही, मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी सरळ भूमिका मांडली. जरांगे पाटील यांच्या वडिलांना मी सांगितलं की त्यांचा पोरगा भारी आहे. आमरण उपोषण करणं सोपं नाही, पण तो समाजासाठी लढत आहे. हेतू प्रामाणिक असला की जनता प्रामाणिकपणे मागे उभी राहते. त्यामुळे सर्वांनी जरांगेना पाठिंबा दिला. मी त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. त्यांनी सरबत घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.


एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कटिबद्द आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मनोजप्रमाणे आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.



रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे


सरकारने याआधी मराठा समाजाला १६ आणि १७ टक्के आरक्षण दिलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने कायदा केला आणि सुप्रिम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं. जेव्हा आरक्षण रद्द झालं त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस आम्ही केलं. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचं काम आम्ही केलं. पण रद्द झालेलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे, असं शिंदे म्हणाले.



रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घ्या


मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. माझे बाबा गावाला असताना तयारी करत होते. तेही मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यामुळे आज सतराव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घ्यावेत, अशी विनंती केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे