INDIA : लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेवर नजर, भोपाळमध्ये INDIAची संयुक्त रॅली

नवी दिल्ली: इंडिया(INDIA) आघाडीची समन्वय समितीची पहिली बैठक संपली आहे. या बैठकीत नव्या विरोधी पक्षांची आघाडीची पहिली संयुक्त रॅली मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होणार असल्याचे ठरवण्यात आले. ही रॅली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे.


यावरून स्पष्ट होते की विरोधी पक्षांच्या आघाडीची नजर लोकसभा निवडणुकीआधी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे.


दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.


या बैठकीत शरद पवार, के सी वेणुगोपाल, टीआर बालू, तेजस्वी यादव, संजय राऊत, संजय झा, हेमंत सोरेन, राघव चढ्ढा, डी राजा, उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि जावेद अली उपस्थित होते.



तृणमूलकडून कोणीही सामील नाही


इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसही सहभागी आहे. त्यांच्याकडून ममता यांचे भाचे अभिषेक बॅन्रजी यांना समन्वय समितीचे सदस्य बनवण्यात आले होते. मात्र ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना आज ईडीच्या समन्सनुसार चौकशीसाठी सामील व्हायचे होते.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे