INDIA : लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेवर नजर, भोपाळमध्ये INDIAची संयुक्त रॅली

नवी दिल्ली: इंडिया(INDIA) आघाडीची समन्वय समितीची पहिली बैठक संपली आहे. या बैठकीत नव्या विरोधी पक्षांची आघाडीची पहिली संयुक्त रॅली मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होणार असल्याचे ठरवण्यात आले. ही रॅली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे.


यावरून स्पष्ट होते की विरोधी पक्षांच्या आघाडीची नजर लोकसभा निवडणुकीआधी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे.


दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.


या बैठकीत शरद पवार, के सी वेणुगोपाल, टीआर बालू, तेजस्वी यादव, संजय राऊत, संजय झा, हेमंत सोरेन, राघव चढ्ढा, डी राजा, उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि जावेद अली उपस्थित होते.



तृणमूलकडून कोणीही सामील नाही


इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसही सहभागी आहे. त्यांच्याकडून ममता यांचे भाचे अभिषेक बॅन्रजी यांना समन्वय समितीचे सदस्य बनवण्यात आले होते. मात्र ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना आज ईडीच्या समन्सनुसार चौकशीसाठी सामील व्हायचे होते.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे