Ram Janmabhoomi : राम जन्मभूमी परिसरात आढळले पुरातन अवशेष; मूर्ती आणि प्राचीन स्तंभ

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम (Ram Janmabhoomi) सुरू असताना त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच या मूर्ती आणि प्राचीन अवशेष आढळून आल्याचे राय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


चंपत राय यांनी फोटोही शेअर केला आहे. मात्र याबाबत आणखी माहिती त्यांनी दिली नाही. राय यांनी शेअर केलेल्या फोटोत मूर्ती, दगड, शिलालेख दिसून येत आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचे दर्शनही घेता येणार आहे. राम मंदिराचे (Ram Mandir) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठेआधी कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात होणारा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जागतिक पातळीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याची जबाबदारी घेतली आहे.


रामभक्तांना दर्शन घेता यावे म्हणून हे अवशेष गॅलरीत ठेवले आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याबाबत माहितीही दिली जात आहे. या अवशेषांवर नक्षीकाम केलेले दिसत आहे. तसेच देवांच्या मूर्तींवरही नक्षीकाम दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च