Ram Janmabhoomi : राम जन्मभूमी परिसरात आढळले पुरातन अवशेष; मूर्ती आणि प्राचीन स्तंभ

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम (Ram Janmabhoomi) सुरू असताना त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच या मूर्ती आणि प्राचीन अवशेष आढळून आल्याचे राय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


चंपत राय यांनी फोटोही शेअर केला आहे. मात्र याबाबत आणखी माहिती त्यांनी दिली नाही. राय यांनी शेअर केलेल्या फोटोत मूर्ती, दगड, शिलालेख दिसून येत आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचे दर्शनही घेता येणार आहे. राम मंदिराचे (Ram Mandir) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठेआधी कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात होणारा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जागतिक पातळीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याची जबाबदारी घेतली आहे.


रामभक्तांना दर्शन घेता यावे म्हणून हे अवशेष गॅलरीत ठेवले आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याबाबत माहितीही दिली जात आहे. या अवशेषांवर नक्षीकाम केलेले दिसत आहे. तसेच देवांच्या मूर्तींवरही नक्षीकाम दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी