Ajit Pawar : नौटंकी करुन महाराष्ट्राचं भलं होणार नाही

अजित पवारांनी काढले उद्धव ठाकरेंचे वाभाडे


जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यांच्या सभांमध्ये सरकारवर टीका करत असतात. मात्र, अत्यंत गैरकारभारी उद्धव ठाकरेंवर भाजप नेत्यांकडूनही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी जळगाव (Jalgaon) येथे सभा घेतली होती. त्यात तर त्यांनी देवेंद्रजींवर टीका करत हद्द पार केली होती. यावर अजित पवारांनीही (Ajit Pawar) त्यांना खडे बोल सुनावले. आज जळगावातच 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अजितदादांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारले.


अजित पवार म्हणाले, "आम्ही कुठेही गेलो तरी विकासाचं बोलतो मात्र काही जण येतात आणि बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का? मी पण वाभाडे काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत. यातून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचं भलं होणार नाही", असं अजित पवार म्हणाले.


अजितदादांनी यावेळी जळगावच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वनासनही दिले. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस कमी पडला. त्या तालुक्यात पाऊस पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असंही अजित पवार म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा