All Party Meeting : मराठा आरक्षणासंदर्भात होणार्‍या सर्वपक्षीय बैठकीला कोणाकोणाला निमंत्रण? यादी आली समोर...

  132

आज बैठकीला कोण राहणार उपस्थित?


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) चालू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललं आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस असून त्यांनी पाणी घेणं बंद केलं आहे, शिवाय सलाईनही काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचेही शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा प्रश्न निकालात काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) बोलावली आहे. विरोधी पक्षांनीही या बैठकीला पाठिंबा देत उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.


मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत निर्णय होणार का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.



कोणाकोणाला आहे निमंत्रण?


१) अशोक चव्हाण, काँग्रेस
२) अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता (ठाकरे गट)
३) विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता (काँग्रेस)
४) उदयनराजे भोसले, खासदार (भाजप )
५) नाना पटोले, काँग्रेस
६) बाळासाहेब थोरात (काँग्रेस )
७) जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
८) राजेश टोपे, राष्ट्रवादी (शरद पवार)
९) चंद्रशेखर बावनकुळे , भाजप
१०) जयंत पाटील , शेकाप
११) हितेंद्र ठाकूर,बहुजन विकास आघाडी
१२) कपिल पाटील, लोकभारती पक्ष
१३) विनय कोरे, जनसुराज्य पक्ष
१४) महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष
१५) बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्ष
१६) राजू पाटील, मनसे
१७) रवी राणा, आमदार
१८) विनोद निकोले, मार्क्सवादी कम्युनिष्पक्ष
१९) संभाजी राजे भोसले, माजी खासदार
२०) प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
२१) सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
२२) जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष
२३) राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
२४) मुख्य सचिव
२५) प्रधान सचिव , विधी व न्याय विभाग



मनोज जरांगेंची मागणी कायम


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या १३ दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत असून, कालपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.