Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार

  103

रस्ते विकास महामंडळाने सादर केला प्रस्ताव


मुंबई : राज्यात वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने कोणत्याही वेळी एक्स्प्रेस वेजवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे.


पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. शिवाय लोणावळा आणि पुण्यातील इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आठवडाअखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन मार्गिका वाढवून आठपदरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठपदरी झाल्यास बाहतूक कोंडी कमी होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाणही टळू शकेल, अशी आशा आहे. सरकारने महामंडळाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल व पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकीकडे, वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची