Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार

रस्ते विकास महामंडळाने सादर केला प्रस्ताव


मुंबई : राज्यात वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने कोणत्याही वेळी एक्स्प्रेस वेजवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे.


पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. शिवाय लोणावळा आणि पुण्यातील इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आठवडाअखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन मार्गिका वाढवून आठपदरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठपदरी झाल्यास बाहतूक कोंडी कमी होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाणही टळू शकेल, अशी आशा आहे. सरकारने महामंडळाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल व पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकीकडे, वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील