Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का?


मुंबई : राज्यात सुरु असलेला मराठा आंदोलनाचा (Maratha Andolan) प्रश्न दिवसेंदिवस जोर धरत आहे. आज सलग बारावा दिवस असूनही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे उपोषण सुरुच आहे व ते अधिक तीव्र करण्याचा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दोन दिवसांपूर्वी जीआर काढून मराठा आरक्षणाची मागणी मान्यदेखील केली होती. मात्र, यातील वंशावळ हा शब्द काढून टाकून सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन आरक्षण मान्य केले जावे, अशी मागणी जरांगेंनी सरकारपुढे ठेवली आहे. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.


मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असफल ठरत असून बाराव्या दिवशीदेखील ते उपोषणावर ठाम आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी देखील अपयशी ठरली. मनोज जरांगेंच्या मागणीवर मुंबईत झालेल्या बैठकीत नवीन जीआर काढण्यात आला मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.


या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट, काँग्रेस, मनसे यांच्यासह ठाकरे गटालाही बैठकीच निमंत्रण दिले जाणार आहे.


उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का?


ठाकरे गट व सत्ताधारी शिवसेना यांच्यात चालू असलेल्या पक्ष आणि नावाच्या संघर्षावर येत्या १४ सप्टेंबरपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुनावणी करणार आहेत. एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे हे पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मराठ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार का, हे पाहावं लागेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

Mumbai Railway: 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा तीन महिने बंद राहणार; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली

पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका लागली कामाला

दोन महिन्यांत २ हजार कोटींचे आहे लक्ष्य मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष