G20 Summit:ब्रिटनच्या पंतप्रधानांचे जय सियाराम बोलून केले स्वागत, भेट दिली भगवद्गगीता

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (rishi sunak) शनिवारपासून सुरू होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी (g-20 summit) शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचले. पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि वरिष्ठ राजनायकांचे स्वागत केले. पाहुण्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक नृत्याचे कौतुक केले. आपल्या तीन दिवसीय भारत यात्रेदरम्यान सुनक पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करतील.


खास बाब म्हणजे केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांचे त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर अभिनंदन करताना जय सियाराम असे म्हणत अभिवादन केले. अश्विन चौबे यांचे मीडिया सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले की स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांनी त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर स्वागत करत जय सियाराम असे म्हटले.


केंद्रीय मंत्री चौबे यांनी आपण बिहारच्या बक्सरचे खासदार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना सांगितले. यासोबतच ब्रिटीश पंतप्रधानांना बक्सरचे महत्त्वही सांगितले.


या केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान ऋषि सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना भारताचे जावई आणि मुलीच्या रूपात स्वागत केले. केंद्रीय मंत्री चौबे म्हणाले की भारतभूमी ही तुमच्या पूर्वजांची भूमी आहे. तुम्ही येथे आल्याने साऱे उत्साहित आहेत. केंद्रीय मंत्री ऋषी सुनक यांना यावेळी केंद्रीय मंत्री चौबे यांनी रुद्राक्ष, श्रीमद्गभगवतगीता आणि हनुमान चालिसा भेट दिली.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा