G20 Summit:ब्रिटनच्या पंतप्रधानांचे जय सियाराम बोलून केले स्वागत, भेट दिली भगवद्गगीता

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (rishi sunak) शनिवारपासून सुरू होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी (g-20 summit) शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचले. पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि वरिष्ठ राजनायकांचे स्वागत केले. पाहुण्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक नृत्याचे कौतुक केले. आपल्या तीन दिवसीय भारत यात्रेदरम्यान सुनक पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करतील.


खास बाब म्हणजे केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांचे त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर अभिनंदन करताना जय सियाराम असे म्हणत अभिवादन केले. अश्विन चौबे यांचे मीडिया सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले की स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांनी त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर स्वागत करत जय सियाराम असे म्हटले.


केंद्रीय मंत्री चौबे यांनी आपण बिहारच्या बक्सरचे खासदार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना सांगितले. यासोबतच ब्रिटीश पंतप्रधानांना बक्सरचे महत्त्वही सांगितले.


या केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान ऋषि सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना भारताचे जावई आणि मुलीच्या रूपात स्वागत केले. केंद्रीय मंत्री चौबे म्हणाले की भारतभूमी ही तुमच्या पूर्वजांची भूमी आहे. तुम्ही येथे आल्याने साऱे उत्साहित आहेत. केंद्रीय मंत्री ऋषी सुनक यांना यावेळी केंद्रीय मंत्री चौबे यांनी रुद्राक्ष, श्रीमद्गभगवतगीता आणि हनुमान चालिसा भेट दिली.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव