G20 Summit:ब्रिटनच्या पंतप्रधानांचे जय सियाराम बोलून केले स्वागत, भेट दिली भगवद्गगीता

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (rishi sunak) शनिवारपासून सुरू होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी (g-20 summit) शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचले. पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि वरिष्ठ राजनायकांचे स्वागत केले. पाहुण्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक नृत्याचे कौतुक केले. आपल्या तीन दिवसीय भारत यात्रेदरम्यान सुनक पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करतील.


खास बाब म्हणजे केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांचे त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर अभिनंदन करताना जय सियाराम असे म्हणत अभिवादन केले. अश्विन चौबे यांचे मीडिया सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले की स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांनी त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर स्वागत करत जय सियाराम असे म्हटले.


केंद्रीय मंत्री चौबे यांनी आपण बिहारच्या बक्सरचे खासदार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना सांगितले. यासोबतच ब्रिटीश पंतप्रधानांना बक्सरचे महत्त्वही सांगितले.


या केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान ऋषि सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना भारताचे जावई आणि मुलीच्या रूपात स्वागत केले. केंद्रीय मंत्री चौबे म्हणाले की भारतभूमी ही तुमच्या पूर्वजांची भूमी आहे. तुम्ही येथे आल्याने साऱे उत्साहित आहेत. केंद्रीय मंत्री ऋषी सुनक यांना यावेळी केंद्रीय मंत्री चौबे यांनी रुद्राक्ष, श्रीमद्गभगवतगीता आणि हनुमान चालिसा भेट दिली.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही