Monsoon: राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई: गेले अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस (monsoon) अखेर पुन्हा कोसळत आहे. राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच ८ आणि ९ सप्टेंबरला मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पेरणी केलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


दरम्यान, मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाची सुरूवात झाली आहे. गुरुवारपासूनच मुंबईत तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहे.


यंदाच्या वर्षात ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. लावलेली पिके करपून जात असल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता. अखेर पावसाचे पुनरागमन झाले आहे.

Comments
Add Comment

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग