Monsoon: राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई: गेले अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस (monsoon) अखेर पुन्हा कोसळत आहे. राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच ८ आणि ९ सप्टेंबरला मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पेरणी केलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


दरम्यान, मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाची सुरूवात झाली आहे. गुरुवारपासूनच मुंबईत तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहे.


यंदाच्या वर्षात ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. लावलेली पिके करपून जात असल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता. अखेर पावसाचे पुनरागमन झाले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत