Aditya L1 :'आदित्य एल १'ने इस्त्रोला पाठवला खास सेल्फी

नवी दिल्ली: भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल १ (aditya l1) आपल्या ध्येयाच्या दिशेने जात आहे. यातच आदित्य एल१ ने प्रवासादरम्यान पृथ्वी आणि चंद्राचा सेल्फी तसेच फोटो घेतला आहे. याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.


याआझी आदित्य एल १ने मंगळवारी पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली होती. इस्त्रोने सांगितले होते की पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित दुसरी प्रक्रिया आयएसटीआरएसी, बंगळुरू येथून यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमध्ये आयएसटीआरएसी/इस्त्रोने केंद्रांच्या या अभियानादरम्यान उपग्रहावर लक्ष दिले. प्राप्त करण्यात आलेली नवी कक्षा २८२ किमी x४०२२५ किमी इतकी आहे. इस्त्रोच्या मते आदित्य एल १ पृथ्वी च्या कक्षेशी संबंधित तिसरी प्रक्रिया १० सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता निर्धारित करण्यात आली.


 


२ सप्टेंबरला लाँच झाली होती मोहीम


इस्त्रोने श्रीहरिकोटा येथून २ सप्टेंबरला ही सूर्य मोहीम लाँच केले होते. आदित्य एल १ला सूर्य पृथ्वीदरमयान एल १ पॉईंटवर स्थापित केले जाणार आहे आणि लाँच झाल्यानंतर याला पोहोचण्यास १२५ दिवस लागतील. यानंतर आदित्य एल १ सूर्यावर रिसर्च करू शकणार आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरल्यावर मोठा रिसर्च केला जाणार आहे. यासोबतच इस्त्रो आपले अनेक मिशन लाँच करणार आहे. यात शुक्र तसेच गगनयान मोहीम पाईपलाईनमध्ये आहे. अंतराळात शुक्र असा एक ग्रह आहे ज्याबाबात म्हटले जाते की हा ग्रह पृथ्वीप्रमाणेच आहे. येथे माणूस राहू शकतो.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च