पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी बदलला आपला प्लान, पाहा काय केलंय...

नवी दिल्ली :जगातील १८ देशांची गुरूवारी इंडोनेशियामध्ये(indonesia) आसियान आणि पूर्व आशिया परिषद भरवली जात आहे. या दोन्ही जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मात्र सगळ्यात मोठी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी आपला प्लान बदलला आहे.


या देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. संमेलनाची सुरूवात याआधी साडेआठ वाजता होणार होती मात्र ती एक तास आधी करण्यात आली आहे. आता याची सुरूवात ७.३० वाजता होणार आहे आणि हे सगळं केलं पंतप्रधान मोदींसाठी.


याचप्रमाणे ७ सप्टेंबरला ईस्ट एशिया संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी व्हायचे आहे. मात्र आधी या संमेलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र आता ही वेळ बदलून दीड तास आधी करण्यात आली आहे. हा बदलही पंतप्रधान मोदींसाठीच करण्यात आला आहे.



का केला बदल?


पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जगातील १८ देशांनी आपल्या प्लानमध्ये बदल केला आहे. भारतात जी-२० परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. पंतप्रधान मोदींना भारत-आसियान परिषद आणि पूर्व आशिया संमेलनात सहभागी झाल्यानंतर गुरूवारीच दिल्लीला परतायचे आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता १८ देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींना दोन्ही संमेलनात सहभागी होता येईल.

Comments
Add Comment

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ