पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी बदलला आपला प्लान, पाहा काय केलंय...

नवी दिल्ली :जगातील १८ देशांची गुरूवारी इंडोनेशियामध्ये(indonesia) आसियान आणि पूर्व आशिया परिषद भरवली जात आहे. या दोन्ही जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मात्र सगळ्यात मोठी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी आपला प्लान बदलला आहे.


या देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. संमेलनाची सुरूवात याआधी साडेआठ वाजता होणार होती मात्र ती एक तास आधी करण्यात आली आहे. आता याची सुरूवात ७.३० वाजता होणार आहे आणि हे सगळं केलं पंतप्रधान मोदींसाठी.


याचप्रमाणे ७ सप्टेंबरला ईस्ट एशिया संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी व्हायचे आहे. मात्र आधी या संमेलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र आता ही वेळ बदलून दीड तास आधी करण्यात आली आहे. हा बदलही पंतप्रधान मोदींसाठीच करण्यात आला आहे.



का केला बदल?


पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जगातील १८ देशांनी आपल्या प्लानमध्ये बदल केला आहे. भारतात जी-२० परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. पंतप्रधान मोदींना भारत-आसियान परिषद आणि पूर्व आशिया संमेलनात सहभागी झाल्यानंतर गुरूवारीच दिल्लीला परतायचे आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता १८ देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींना दोन्ही संमेलनात सहभागी होता येईल.

Comments
Add Comment

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या

मांजरीच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांना भरावा लागला " इतका " दंड

नोएडा : नोएडामध्ये उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे मांजरीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ग्राहक विवाद

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय