पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी बदलला आपला प्लान, पाहा काय केलंय...

  80

नवी दिल्ली :जगातील १८ देशांची गुरूवारी इंडोनेशियामध्ये(indonesia) आसियान आणि पूर्व आशिया परिषद भरवली जात आहे. या दोन्ही जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मात्र सगळ्यात मोठी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी आपला प्लान बदलला आहे.


या देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. संमेलनाची सुरूवात याआधी साडेआठ वाजता होणार होती मात्र ती एक तास आधी करण्यात आली आहे. आता याची सुरूवात ७.३० वाजता होणार आहे आणि हे सगळं केलं पंतप्रधान मोदींसाठी.


याचप्रमाणे ७ सप्टेंबरला ईस्ट एशिया संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी व्हायचे आहे. मात्र आधी या संमेलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र आता ही वेळ बदलून दीड तास आधी करण्यात आली आहे. हा बदलही पंतप्रधान मोदींसाठीच करण्यात आला आहे.



का केला बदल?


पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जगातील १८ देशांनी आपल्या प्लानमध्ये बदल केला आहे. भारतात जी-२० परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. पंतप्रधान मोदींना भारत-आसियान परिषद आणि पूर्व आशिया संमेलनात सहभागी झाल्यानंतर गुरूवारीच दिल्लीला परतायचे आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता १८ देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींना दोन्ही संमेलनात सहभागी होता येईल.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन