Jayant Patil : जयंत पाटील अखेर खरे बोलले, कोरोनाकाळात सगळ्यांनीच लुबाडले!

सांगली : आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले. कोरोना महामारीच्या काळात सगळ्यांनीच जनतेला लुबाडले, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बोलण्याच्या ओघात दिली.


डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.


कोरोना काळात आरोग्य सुविधा का महत्त्वाच्या आहेत हे कळले आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये उपचारसाठी आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणाच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं आत गेली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले असा आरोपीही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.



कोरोना काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट


कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली होती. असे असताना त्या काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाली. कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे होते, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे दिसून येत होते.


राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले होते. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याचेही विदारक चित्र आले होते.



रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट


सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ आली होती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु होती. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर ऑक्सिजन न मिळू शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य