सांगली : आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले. कोरोना महामारीच्या काळात सगळ्यांनीच जनतेला लुबाडले, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बोलण्याच्या ओघात दिली.
डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना काळात आरोग्य सुविधा का महत्त्वाच्या आहेत हे कळले आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये उपचारसाठी आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणाच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं आत गेली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले असा आरोपीही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली होती. असे असताना त्या काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाली. कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे होते, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे दिसून येत होते.
राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले होते. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याचेही विदारक चित्र आले होते.
सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ आली होती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु होती. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर ऑक्सिजन न मिळू शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…