Jayant Patil : जयंत पाटील अखेर खरे बोलले, कोरोनाकाळात सगळ्यांनीच लुबाडले!

  150

सांगली : आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले. कोरोना महामारीच्या काळात सगळ्यांनीच जनतेला लुबाडले, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बोलण्याच्या ओघात दिली.


डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.


कोरोना काळात आरोग्य सुविधा का महत्त्वाच्या आहेत हे कळले आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये उपचारसाठी आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणाच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं आत गेली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले असा आरोपीही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.



कोरोना काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट


कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली होती. असे असताना त्या काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाली. कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे होते, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे दिसून येत होते.


राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले होते. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याचेही विदारक चित्र आले होते.



रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट


सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ आली होती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु होती. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर ऑक्सिजन न मिळू शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला