Jalana Maratha Andolan : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी गावात

काय निर्णय होणार?


जालना : जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या (Jalana Maratha Andolan) प्रश्नावर काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळातून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे या चर्चेला यश मिळाले नाही. यास्तव उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. दुपारी १२:३० वाजता हे मंडळ गावात दाखल होईल, अशी माहिती मिळत आहे.


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati village) येथे गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या आंदोलनाचा प्रश्न फारच चिघळला आहे. काल राज्य सरकारने न्यायालयात टिकेल असं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यामुळे ठिकठिकाणी मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. तर आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या निर्णयानंतर पाणीही न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारला यावर लवकरात लवकर निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणार्‍या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. या घटनेचे राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे तर सरकार मात्र अडचणीत सापडले आहे. ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळातर्फे आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य