India vs Bharat : 'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी

भारत-इंडिया वादावर भाजप खासदारांची स्पष्ट भूमिका


नवी दिल्ली : आज राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) जी-२० प्रतिनिधींसाठी रात्रीच्या जेवणाचे आलेले अधिकृत निमंत्रण खूप मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया (President of India) ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President of Bharat) असा उल्लेख केला. विरोधकांनी यावर अनेक सवाल उठवले असले तरी भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव 'इंडिया' ठेवले म्हणून हा बदल करण्यात आला नसून यासंबंधी गेले सहा महिने चर्चा सुरु आहे, असे भाजपने सांगितले आहे.


भाजप खासदार हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत हा शब्द वापरण्यामागील केंद्र सरकारची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, 'इंडिया' या शब्दाचे वर्णन गुलामगिरी आणि दास्यत्वाचे प्रतीक म्हणून केले जाते. तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.


पुढे ते म्हणाले, इंग्रजीतील इंडिया हा शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण एक अशिक्षित समुदाय आहोत. जगात असलेल्या अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, मूर्ख लोक अशा लोकांना त्यांनी इंडिया शब्द दिलेला आहे. पण आपल्या इथे अशा विकृत मानसिकतेचे घटक आहेत जे लोकांची दिशाभूल करतात की, इंग्रज सिंधमधून आले होते, त्यांना सिंध बोलता येत नव्हते, ते इंद बोलत असत… हळूहळू इंडिया बनला, असं ते म्हणाले.



'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी


हरनाथ सिंह यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले, “मला त्या मूर्ख, वेड्या लोकांना विचारायचे आहे की जर सिंध इंडिया झाला तर इंडोनेशियामध्ये सिंध नदी कुठे होती? अँग्लो-इंडियन ज्या भागात राहत होते त्या भागात सिंध नदी कोठे होती? असे अनेक देश आहेत जिथे इंड हा शब्द आहे, कुठे सिंध नदी होती? इंडिया हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे इंडिया हा शब्द हटवावा.



देशातील जनतेने भारत म्हटलं पाहिजे


पुढे भारत या शब्दाचं महत्त्व आणि इतिहास पटवून देताना वेदातील एका श्लोकाचा संदर्भ देत हरनाथ सिंह यादव म्हणाले की, महासागराच्या उत्तरेला हिमालय आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात, इथल्या लोकांना भारतीय लोक म्हणतात. त्यामुळे इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा. संपूर्ण देशाला हे हवे आहे, कानाकोपऱ्यातून मागण्या येत आहेत, आमच्या आदरणीय आरएसएस सरसंघचालकांनीही भारत शब्दासाठी आवाहन केले आहे की, देशातील जनतेने भारत हा शब्द बोलला पाहिजे, इतर कोणताही शब्द बोलू नये. या देशाचे नाव भारत आहे, दुसरे नाव नाही. भारत या शब्दात जो आत्मा आहे, तो जिवंत आहे, तो आपल्याला ऊर्जा देतो, श्रद्धेची भावना दाखवतो, तसा इंडियात नाही, असंही ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी

PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन

PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.