India vs Bharat : 'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी

भारत-इंडिया वादावर भाजप खासदारांची स्पष्ट भूमिका


नवी दिल्ली : आज राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) जी-२० प्रतिनिधींसाठी रात्रीच्या जेवणाचे आलेले अधिकृत निमंत्रण खूप मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया (President of India) ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President of Bharat) असा उल्लेख केला. विरोधकांनी यावर अनेक सवाल उठवले असले तरी भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव 'इंडिया' ठेवले म्हणून हा बदल करण्यात आला नसून यासंबंधी गेले सहा महिने चर्चा सुरु आहे, असे भाजपने सांगितले आहे.


भाजप खासदार हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत हा शब्द वापरण्यामागील केंद्र सरकारची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, 'इंडिया' या शब्दाचे वर्णन गुलामगिरी आणि दास्यत्वाचे प्रतीक म्हणून केले जाते. तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.


पुढे ते म्हणाले, इंग्रजीतील इंडिया हा शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण एक अशिक्षित समुदाय आहोत. जगात असलेल्या अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, मूर्ख लोक अशा लोकांना त्यांनी इंडिया शब्द दिलेला आहे. पण आपल्या इथे अशा विकृत मानसिकतेचे घटक आहेत जे लोकांची दिशाभूल करतात की, इंग्रज सिंधमधून आले होते, त्यांना सिंध बोलता येत नव्हते, ते इंद बोलत असत… हळूहळू इंडिया बनला, असं ते म्हणाले.



'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी


हरनाथ सिंह यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले, “मला त्या मूर्ख, वेड्या लोकांना विचारायचे आहे की जर सिंध इंडिया झाला तर इंडोनेशियामध्ये सिंध नदी कुठे होती? अँग्लो-इंडियन ज्या भागात राहत होते त्या भागात सिंध नदी कोठे होती? असे अनेक देश आहेत जिथे इंड हा शब्द आहे, कुठे सिंध नदी होती? इंडिया हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे इंडिया हा शब्द हटवावा.



देशातील जनतेने भारत म्हटलं पाहिजे


पुढे भारत या शब्दाचं महत्त्व आणि इतिहास पटवून देताना वेदातील एका श्लोकाचा संदर्भ देत हरनाथ सिंह यादव म्हणाले की, महासागराच्या उत्तरेला हिमालय आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात, इथल्या लोकांना भारतीय लोक म्हणतात. त्यामुळे इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा. संपूर्ण देशाला हे हवे आहे, कानाकोपऱ्यातून मागण्या येत आहेत, आमच्या आदरणीय आरएसएस सरसंघचालकांनीही भारत शब्दासाठी आवाहन केले आहे की, देशातील जनतेने भारत हा शब्द बोलला पाहिजे, इतर कोणताही शब्द बोलू नये. या देशाचे नाव भारत आहे, दुसरे नाव नाही. भारत या शब्दात जो आत्मा आहे, तो जिवंत आहे, तो आपल्याला ऊर्जा देतो, श्रद्धेची भावना दाखवतो, तसा इंडियात नाही, असंही ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर