Golden Ticket : क्रिकेटप्रेमी बिग बींना वर्ल्ड कपचं गोल्डन तिकीट

काय आहे ही बीसीसीआयची भेट?


मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे ८ ऑक्टोबरला होणार आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हा सामना प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा असते, परंतु तिकीट महाग असते. क्रिकेटप्रेमी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मात्र अगदी एकही रुपया खर्च न करता हे सामने पाहता येणार आहेत. याचं कारण म्हणजे बीसीसीआयच्या (BCCI)वतीने बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना स्पर्धेसाठी गोल्डन तिकीटाच्या रूपात एक खास भेट दिली आहे.


गोल्डन तिकीट हे एक असं तिकीट आहे, ज्यामुळे बिग बींना भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये सामना पाहता येऊ शकतो आणि त्यांना प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान देखील मिळेल. जय शाह यांनी आज अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन तिकीट दिले. हे तिकीट देतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


बीसीसीआयने फोटो शेअर करताना म्हटले, "आमच्या गोल्डन आयकॉन्ससाठी गोल्डन तिकिट. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आज सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकिट देण्याचा बहुमान मिळाला. एक दिग्गज अभिनेता आणि क्रिकेटचे कट्टर चाहते. श्री. अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला असलेला सततचा पाठिंबा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांना आमच्यासोबत सामील करून घेताना आम्ही उत्सुक आहोत."





आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. ४ अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजांसह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम

EV : महाराष्ट्रात ई वाहनांना चालना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे वितरण

मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र

अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने