Golden Ticket : क्रिकेटप्रेमी बिग बींना वर्ल्ड कपचं गोल्डन तिकीट

काय आहे ही बीसीसीआयची भेट?


मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे ८ ऑक्टोबरला होणार आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हा सामना प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा असते, परंतु तिकीट महाग असते. क्रिकेटप्रेमी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मात्र अगदी एकही रुपया खर्च न करता हे सामने पाहता येणार आहेत. याचं कारण म्हणजे बीसीसीआयच्या (BCCI)वतीने बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना स्पर्धेसाठी गोल्डन तिकीटाच्या रूपात एक खास भेट दिली आहे.


गोल्डन तिकीट हे एक असं तिकीट आहे, ज्यामुळे बिग बींना भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये सामना पाहता येऊ शकतो आणि त्यांना प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान देखील मिळेल. जय शाह यांनी आज अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन तिकीट दिले. हे तिकीट देतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


बीसीसीआयने फोटो शेअर करताना म्हटले, "आमच्या गोल्डन आयकॉन्ससाठी गोल्डन तिकिट. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आज सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकिट देण्याचा बहुमान मिळाला. एक दिग्गज अभिनेता आणि क्रिकेटचे कट्टर चाहते. श्री. अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला असलेला सततचा पाठिंबा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांना आमच्यासोबत सामील करून घेताना आम्ही उत्सुक आहोत."





आता एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होण्यासाठी केवळ एक महिना राहिला आहे, याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडे आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. ४ अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजांसह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली