पल्लेकल: पाकिस्तानविरुद्धचा(pakistan) सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आशिया चषकमध्ये(asia cup 2023) भारताचा सामना आज नेपाळविरुद्ध (nepal) रंगत आहे. नेपाळने भारताला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने निर्धारित ५० षटकांत इतक्या धावा केल्या.
भारताला या सामन्यात जिंकायचे असल्यास इतक्या धावा कराव्याच लागतील. नेपाळची सुरूवात चांगली झाली. नेपाळच्या कुशल भुर्टेलने ३८ धावा केल्या तर आसिफ शेखने ५८ धावांची खेळी केली. खालच्या फळीतील सोमपाल कामीने ४८ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नाही आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतासाठी करो वा मरो
भारतासाठी हा सामना करो वा मरो आहे. भारताला सुपर ४मध्ये पोहोचायचे असेल तर नेपाळला हरवावेच लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातनंतर भारताकडे एक गुण आहे. पाकिस्तानचा संघ आधीच सुपर ४मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचा हा सामना जिंकावाच लागेल.