Jawan: शाहरूखच्या जवानची बॉक्स ऑफिसवर इतकी अॅडव्हान्स बुकिंग, पहिल्या दिवशी विकली लाखो तिकीटे

मुंबई: शाहरूख खानचा (shahrukh khan) आगामी सिनेमा जवान (jawan) सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या सुरूवातीचे आकडे पाहता असे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे. जवानचे तिकीट बुकिंगचे आकडे पठाणच्या ओपनिंग रेकॉर्डच्या बरोबर आहे. सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाही.


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार जवानच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे २ लाखापर्यंत पोहोचले आहेत. पीव्हीआर आणि आयनॉक्स मिळून तब्बल १ लाख ८३५०० इतके बुकिंग झाले आहेत. तर सिनेपोलिस येथे ३९ हजार तिकीटांची बुकिंग झाली आहे. म्हणजेच एकूण मिळून २२२,५०० तिकीटे बुक झाली आहेत.


 


पठाण आणि गदर २ या सिनेमांप्रमाणेच शाहरूखच्या या सिनेमालाही प्रचंड गर्दी होणार असल्याचे दिसत आहे. कारण ही तिकीटे धडाधड विकली जात आहेत. अनेक थिएटरमध्ये तर शाहरूखच्या जवानचा पहिल्या दिवसाचा शो हाऊसफुल्ल आहे. वीकेंडलाही शो हाऊसफुल्ल होत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानच्या चाहत्यांनी मुंबईच्या वांद्रे स्थित Gaiety आणि गॅलॅक्सी थिएटरचे सकाळचे शोज बुक झाले आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया पाहता हा सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ७ सप्टेंबरच्या आधी काहीही म्हणणे घाईचे ठरेल. कारण त्या दिवशी समीक्षक सिनेमाच्या समीक्षेबद्दल सांगतील.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून