Jawan: शाहरूखच्या जवानची बॉक्स ऑफिसवर इतकी अॅडव्हान्स बुकिंग, पहिल्या दिवशी विकली लाखो तिकीटे

Share

मुंबई: शाहरूख खानचा (shahrukh khan) आगामी सिनेमा जवान (jawan) सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या सुरूवातीचे आकडे पाहता असे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे. जवानचे तिकीट बुकिंगचे आकडे पठाणच्या ओपनिंग रेकॉर्डच्या बरोबर आहे. सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाही.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार जवानच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे २ लाखापर्यंत पोहोचले आहेत. पीव्हीआर आणि आयनॉक्स मिळून तब्बल १ लाख ८३५०० इतके बुकिंग झाले आहेत. तर सिनेपोलिस येथे ३९ हजार तिकीटांची बुकिंग झाली आहे. म्हणजेच एकूण मिळून २२२,५०० तिकीटे बुक झाली आहेत.

 

पठाण आणि गदर २ या सिनेमांप्रमाणेच शाहरूखच्या या सिनेमालाही प्रचंड गर्दी होणार असल्याचे दिसत आहे. कारण ही तिकीटे धडाधड विकली जात आहेत. अनेक थिएटरमध्ये तर शाहरूखच्या जवानचा पहिल्या दिवसाचा शो हाऊसफुल्ल आहे. वीकेंडलाही शो हाऊसफुल्ल होत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानच्या चाहत्यांनी मुंबईच्या वांद्रे स्थित Gaiety आणि गॅलॅक्सी थिएटरचे सकाळचे शोज बुक झाले आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया पाहता हा सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ७ सप्टेंबरच्या आधी काहीही म्हणणे घाईचे ठरेल. कारण त्या दिवशी समीक्षक सिनेमाच्या समीक्षेबद्दल सांगतील.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

38 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

1 hour ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago