Maratha samaj Andolan : मराठा आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत एसटीचे तब्बल ४ कोटींचे नुकसान

१९ एसटी गाड्या थांबवून करण्यात आली जाळपोळ


जालना : जालना (Jalna) येथे शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Samaj Reservation) आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. या घटनेचे तीव्र प्रतिसाद अख्ख्या राज्यात उमटत असून मराठा आंदोलक (Maratha Andolan) अधिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) तर काही ठिकाणी जाळपोळ करत निषेध नोंदवण्यात येत आहे. सरकारने यावर सखोल चौकशीचे व कारवाईचे आदेश दिलेले असले तरी मराठा आंदोलकांचा रोष मात्र कायम आहे. यातूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची (ST Buses) तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


जालन्यात आज रविवारीही प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला आहे, मात्र म्हणावी तितकी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत त्यामुळे दोन दिवसांनंतरही वातावरण तापलेलेच आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोका केला. एसटी महामंडळाच्या काही गाड्या जाळण्यात आल्या, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी बस थांबवून नुकसान करण्यात आले. आतापर्यंत १९ गाड्यांची जाळपोळ झाली आहे. महामंडळाला यामुळे अंदाचे ४ कोटींचे नुकसान झाले आहे.



काही बस फेऱ्या करण्यात आल्या रद्द


राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांची निदर्शने सुरु आहेत. मुंबईमध्ये देखील मराठा आंदोलक निदर्शने करणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करत आज सकाळी दहा ते अकरा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आल्याचीही माहिती आहे.


या गरम वातावरणामुळे व झालेल्या नुकसानामुळे एसटी महामंडळाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जालन्यासह नांदेड जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यातील बस फेऱ्यांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. रविवारीही मराठा आंदोलकांचा संताप कायम असल्याने बस स्थानकांमधून कमी गाड्या बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण