Aditya L-1 Mission : मानवजातीच्या कल्याणासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही केले कौतुक


नवी दिल्ली : भारताने आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम (Chandrayaan Mission) अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असाच क्षण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले. यानंतर काहीच दिवसांत भारताने आपली पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली. आज या मोहिमेतील आदित्य एल-१ चे (Aditya L-1) यशस्वी उड्डाण झाले असून त्यानिमित्त भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश' असं ट्विट करत पुन्हा एकदा भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे, भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाची चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असं मोदीजी म्हणाले आहेत.





अमित शाह यांनीही केले कौतुक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य आणि तेज सिद्ध केले आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. या अतुलनीय कामगिरीसाठी इस्रो संघाचे अभिनंदन. अमृत महोत्सवादरम्यान अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने ही एक मोठी वाटचाल आहे, असं अमित शाह म्हणाले.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान