Aditya L-1 Mission : मानवजातीच्या कल्याणासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही केले कौतुक


नवी दिल्ली : भारताने आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम (Chandrayaan Mission) अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असाच क्षण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले. यानंतर काहीच दिवसांत भारताने आपली पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली. आज या मोहिमेतील आदित्य एल-१ चे (Aditya L-1) यशस्वी उड्डाण झाले असून त्यानिमित्त भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश' असं ट्विट करत पुन्हा एकदा भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे, भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाची चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असं मोदीजी म्हणाले आहेत.





अमित शाह यांनीही केले कौतुक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य आणि तेज सिद्ध केले आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. या अतुलनीय कामगिरीसाठी इस्रो संघाचे अभिनंदन. अमृत महोत्सवादरम्यान अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने ही एक मोठी वाटचाल आहे, असं अमित शाह म्हणाले.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर