Rasta Roko Andolan : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ रविवारी सोलापुरातील सर्व महामार्ग एक तास बंद

  193

एसटी वाहतूकही बंद राहणार


सोलापूर : जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) चालू असलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना काल घडली. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग रविवारी ३ सप्टेंबरला सकाळी दहा ते अकरा या वेळेत एक तास बंद करण्याचे ठरले आहे. यावेळेस संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.


सोलापूर शहर, करमाळा, माढा, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी त्या त्या तालुक्यातील लोकांनी रास्तारोको (Rasta Roko Andolan) करून जाहीर निषेध दर्शवायचा आहे, असं आवाहन सकल मराठा समाज, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलं आहे.


मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर काही ठिकाणी एसटी गाड्यांची तोडफोड तर काही ठिकाणी बस जाळण्याचे प्रकार घडत आहेत. संभाव्य नुकसान आणि प्रवाशांची सुरक्षितता, यामुळे सध्या राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील एसटी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या सूचना आल्यावरच त्याठिकाणी बससेवा सुरू होणार आहे.



नेमकं प्रकरण काय?


जालना येथे मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जमलेल्या अबाल वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले यांच्यावर काल शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. ग्रामस्थ शांततेच्या मार्गाने आंदोलनस्थळी बसले असताना पोलीस कर्मचारी मात्र फौज फाटा घेऊन दंगलीप्रमाणे हेल्मेट व संरक्षक जाळी घेऊन आंदोलन स्थळी जातात, याचाच अर्थ पोलिसांनी जाणून-बुजून हा हल्ला केला आहे, त्यामुळे त्याचा जाहीर निषेध समाजाच्या वतीने होत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक