Jalna maratha Andolan : हिंदू समाजाला जाती-जाती मध्ये झुंजवायचे आणि जिहादी बापांना खुश ठेवायचे हाच विरोधकांचा खरा कार्यक्रम

जालना पोलिसांच्या कृतीवर नितेश राणे यांचा तीव्र संताप


मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Jalna Maratha Reservation Protest) करत आहेत. याला विरोध करत आज पोलिसांनी आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध केला आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अशा अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असा सरकारला इशारा दिला आहे, तर सातत्याने दंगली होणार अशी वक्तव्ये करणार्‍या उबाठा गटाच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलेच धारेवर धरले आहे.


नितेश राणे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जालना जिल्ह्यात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला त्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध आहे. राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.


पुढे त्यांनी लिहिले आहे की, प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे (Hindu Protests) हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे. लव जिहाद, लँड जिहाद सारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीच यायला लागले आहेत. हिंदू सामाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही. म्हणून हिंदू समाजाला जाती-जाती मध्ये झुंजवत ठेवायचे आणि आपल्या जिहादी बापांना खुश ठेवायचे हाच खरा कार्यक्रम आहे! अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी केली आहे.





मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी हा डाव वेळीच ओळखावा


मराठा आरक्षण हे राणे समितीच्या अहवाला मुळे मिळालं आणि ते आरक्षण फडणवीस साहेबांनी टिकवून दाखवलं. पण विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल काही देणंघेणं नाही. सत्तेत असताना यांनी आरक्षणाच्या केसची वाट लावली. समाजाला ही माहीत आहे, आरक्षण परत आमचंच सरकार देणार. शांत आंदोलन होत असताना पोलिसांवर दगड कोणी मारायला लावले? मविआच्या नेत्यांची खरी चिंता मराठा आरक्षण पेक्षा राज्यात निघणाऱ्या “हिंदू जनआक्रोश मोर्चाची” आहे. हिंदू समाजाला आपसात लढवत ठेवायचे! मराठा समाजाच्या माझ्या बांधवांनी हा डाव वेळीच ओळखावा. हीच विनंती!



हीच का ती दंगल?


काल रात्री छत्रपती संभाजीनगरला कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते, मग हीच ती दंगल होती का? अशा शब्दांत नितेश राणे यांनी उबाठा गटाचा समाचार घेतला आहे.



काय आहेत नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया?


विकास पवार या एका नेटकर्‍याने देखील या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांच्या ट्वीटला रिप्लाय करत त्याने निहिले आहे की, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणारे मराठे असू शकत नाहीत. ५८ मोर्चे शांततेत काढणारा माझा मराठा समाज असे कृत्य करणार नाही. हे कोणी घडवून आणलं? आंदोलनात समाज कंटक कोणी घुसवले आहेत? पोलीस प्रत्येक समाजकंटकाला घरातून शोधून काढणार, मराठा समाजाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ; हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे वैर संपल्याची दिली माहिती मुंबई :

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५