G20: १.३ लाख जवान, बुलेटप्रूफ गाड्या, दिल्लीत जी-२०साठी अशी आहे तयारी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ९ आणि १० डिसेंबरला जी२० परिषद (g-20 summit) होत आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोसह अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत पोहोचणार आहेत. या परिषदेआधी संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट आहे. सुरक्षेसाठी तब्बल १.३० लाख जवान तैनात करण्यात येणार आहेत.


या जागतिक परिषदेसाठी गृहमंत्रालयाच्या अनेक बैठका होत आहेत. दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेसाठी दिल्ली पोलीस मुख्य रूपाने नोडल एजन्सी आहे. मात्र सर्व अर्धसैनिक बलांचे जवानांनाही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफ जवानांचे ५० संघ तयार करण्यात आले आहेत ज्यात साधारण १००० जवान सहभागी होतील. याशिवाय ३०० बुलेटप्रूफ वाहनांनाही तयार केले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफचे व्हीआयपी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्या एक हजार जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे ते सामान्य कर्मचारी नाहीत. यात ते जवानही सामील आहेत जे व्हीआयपी सुरक्षेचा एक भाग होते. हे ते कमांडो आहेत जे कधी ना कधी एसपीजी आणि एनएसजी सारख्या सुरक्षा युनिटमध्ये काम केलेले आहे. हे सर्व जवान परदेशी राष्ट्राध्यक्ष आणि सरकारच्या प्रमुखांच्या व्हीआयपी रूट्सच्या कारकेडमध्ये चालतील.



व्हीआयपी ताफ्याची सुरक्षा असणार अभेद्य


सीआरपीएफच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये स्पेशल कमांडोजसाठी व्हीआयपी ताफ्यापासून ते राहण्याच्या स्थानापर्यंत सुरक्षेसाठीची संपूर्ण ट्रेनिंग देण्यात आली आहे. हॉटेल अथवा बैठक स्थानापासून ते व्हीआयपी गाडीपर्यंत कसे पोहोचायचे आहे त्यावेळेस सुरक्षेसाठी कोणते प्रोटोकॉल असणार आहेत याबाबतची विस्तृत माहिती कमांडोना देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील