INDIA Alliance : संयोजक पदावरुन विरोधकांमध्ये तू तू मैं मैं... विरोधकांची आघाडी की धुसफूस?

आज होणार का निर्णय?


मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी (Opposition Parties Alliance) स्थापन केली आहे. आज त्यांच्या मुंबईतील (Mumbai) बैठकीचा दुसरा दिवस असून सकाळी १० ते २ या वेळेत ही बैठक पार पडते आहे. आजच्या बैठकीत या आघाडीच्या संयोजक पदाचा (Coordinator) चेहरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पदासाठी अंतर्गत धुसफूस चालू असल्याचे चित्र आहे. शिवाय आधी आघाडीत २६ पक्ष होते. मात्र दोन पक्षांच्या समावेशामुळे विरोधकांच्या आघाडीच्या लोगोचे आज होणारे अनावरणही पुढे ढकलण्यात आले आहे.


विरोधकांच्या आघाडीच्या संयोजक पदावरुन काँग्रेस पक्ष (Congress) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत व एक दलित चेहराही आहेत. त्यामुळे देशभरातील दलित मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक करावं, त्यांचा राजकीय अनुभव या आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही पक्षांचं म्हणणं आहे.



सगळ्यांनाच व्हायचंय संयोजक


महत्त्वाची बाब म्हणजे, इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संयोजक पदासाठी हट्टाला पेटले आहेत. तर, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवारांची मनधरणी करत आहेत.



या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे?


दरम्यान, संयोजक पदी अशी एखादी व्यक्ती असावी, जिच्यावर टीका करणं भाजपसाठी सोपं नसेल, असं सर्वपक्षीयांचं मत असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार यांनीच सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव या स्पर्धेत असताना आणि काँग्रेसकडून आग्रह केला जात असताना, आघाडीतील अन्य नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. दरम्यान, असं कोडं समोर असताना मुंबईतील इंडिया बैठकीमध्ये संयोजक पदाचं नाव जाहीर केलं जाणार की आणखी वेळ घेतला जाणार? हे पाहावं लागेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.