INDIA Alliance : संयोजक पदावरुन विरोधकांमध्ये तू तू मैं मैं... विरोधकांची आघाडी की धुसफूस?

आज होणार का निर्णय?


मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी (Opposition Parties Alliance) स्थापन केली आहे. आज त्यांच्या मुंबईतील (Mumbai) बैठकीचा दुसरा दिवस असून सकाळी १० ते २ या वेळेत ही बैठक पार पडते आहे. आजच्या बैठकीत या आघाडीच्या संयोजक पदाचा (Coordinator) चेहरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पदासाठी अंतर्गत धुसफूस चालू असल्याचे चित्र आहे. शिवाय आधी आघाडीत २६ पक्ष होते. मात्र दोन पक्षांच्या समावेशामुळे विरोधकांच्या आघाडीच्या लोगोचे आज होणारे अनावरणही पुढे ढकलण्यात आले आहे.


विरोधकांच्या आघाडीच्या संयोजक पदावरुन काँग्रेस पक्ष (Congress) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत व एक दलित चेहराही आहेत. त्यामुळे देशभरातील दलित मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक करावं, त्यांचा राजकीय अनुभव या आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही पक्षांचं म्हणणं आहे.



सगळ्यांनाच व्हायचंय संयोजक


महत्त्वाची बाब म्हणजे, इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संयोजक पदासाठी हट्टाला पेटले आहेत. तर, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवारांची मनधरणी करत आहेत.



या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे?


दरम्यान, संयोजक पदी अशी एखादी व्यक्ती असावी, जिच्यावर टीका करणं भाजपसाठी सोपं नसेल, असं सर्वपक्षीयांचं मत असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार यांनीच सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव या स्पर्धेत असताना आणि काँग्रेसकडून आग्रह केला जात असताना, आघाडीतील अन्य नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. दरम्यान, असं कोडं समोर असताना मुंबईतील इंडिया बैठकीमध्ये संयोजक पदाचं नाव जाहीर केलं जाणार की आणखी वेळ घेतला जाणार? हे पाहावं लागेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला