Pew Research Center : ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास

  275

परदेशातील ५५ टक्के भारतीयांची मोदींना पसंती : सर्वेक्षण


नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत प्यू रिसर्च सेंटरचा (Pew Research Center) अहवाल नुकताच जारी करण्यात आला आहे. यात १० पैकी आठ म्हणजेच ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि अलिकडच्या काळात मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा जागतिक प्रभाव वाढल्याचा विश्वास १० पैकी सात भारतीयांना आहे. जी२० परिषदेपूर्वी मंगळवारी हा अहवाल जारी करण्यात आला आहे.


सर्वेक्षणात जगभरातील लोकांचे भारताविषयीचे मत सामान्यत: सकारात्मक होते. सरासरी ४६ टक्के लोकांनी भारताबाबत अनुकूल मत व्यक्त केले. तर ३४ टक्के लोकांचे मत प्रतिकूल होते. याशिवाय १६ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.


हे सर्वेक्षण जगातील २४ देशांमध्ये २० फेब्रुवारी पासून २२ मे दरम्यान करण्यात आल्याचे प्यू रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात सांगितले आहे. सर्वेक्षणादरम्यान ३० हजार ८६१ लोकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे जागतिक मत आणि इतर देशांबद्दल भारतीयांचे मत तपासण्यात आले. प्यू रिसर्च सेंटरने भारतीयांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबाबत सर्वेक्षणाच्या अहवालात माहिती दिली आहे.



परदेशातील ५५ टक्के भारतीयांची मोदींना पसंती : सर्वेक्षण


प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात परदेशातील ५५ टक्के भारतीयांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. मोदी २०१४ पासून सत्तेत आहेत आणि पुढच्या निवडणुकीत तिसरी टर्म देखील तेच पंतप्रधान असावेत असे त्यांचे मत आहे. २०२३ मध्ये केवळ २० टक्के भारतीयांनी मोदींबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.


याशिवाय दहा पैकी सात भारतीयांना वाटते की गेल्या काही वर्षात भारताचा प्रभाव अधिक मजबूत होत आहे. तर पाचपेक्षा कमी जणांना भारताचा प्रभाव कमकुवत झाल्याचे वाटते.


नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा उंचावला आहे हे बहुतांश भारतीय मान्य करतात. आंतरराष्ट्रीय प्रकरणात योग्य पावलं उचलण्यावरुन पंतप्रधानांवर ३७ टक्के लोकांचा विश्वास आहे तर ४० टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास नसल्याचे सांगितले.



मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताचा प्रभाव वाढल्याचे ६८ टक्के लोकांचे मत


जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ६८ टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा प्रभाव वाढल्याचे सांगितले. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात इस्रायलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या ७३ टक्के लोकांचा भारतावर विश्वास आहे.



रशिया हाच भारताचा खरा मित्र


दुसरीकडे भारतीयांचा अमेरिकेवरील विश्वास वाढला असला तरी रशियावरील विश्वास कमी झालेला नाही. ६५ टक्के भारतीयांचे मत आहे की अमेरिकेची भूमिका भारताच्या हिताची आहे तर ५७ टक्के लोक रशियाला भारताचा मित्र समजतात.

Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी