Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला!

हल्लेखोरांकडून डमी वेबसाईटद्वारे नागरिकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न


नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) करत, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडूनच एक निवेदन जारी करण्यात आले आहे.


सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या निवेदनात रजिस्ट्रीच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याचे नमुद केले आहे. अधिकृत वेबसाईटप्रमाणे दिसणारी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून, याच्याद्वारे नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर नागरिकांनी त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती अपलोड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सुप्रीम कोर्टाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती www.spi.gov.in अशी आहे. मात्र, सायबर चोरट्यांनी spi.gv.com अशा युआरएलने फेक वेबसाईट बनवण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यास लोकांची खासगी आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वेबसाईटशिवाय कोणत्याही फेक वेबसाईटला बळी पडू नये तसेच तुमचा डेटा चोरीला गेला असेल, तर त्याबाबत तातडीने सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सध्या सुप्रीम कोर्टाची अनेक कामे ही ऑनलाईन होत असून, त्यात अशाप्रकारे सायबर हल्ला झाल्याचे वृत्त धक्कादायक मानले जात आहे.

Comments
Add Comment

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान