लग्नबंधनात अडकणार होते मात्र अचानक हॉटेलमध्ये लागली आग आणि...

भुज: मुंबईच्या(mumbai) एका हॉटेलमध्ये रविवारी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एनआयआर किशन हलाई आणि त्याची भावी पत्नी २५ वर्षीय रुपाली वेकारिया यांचा मृत्यू झाला. किशन आणि रूपाली यांचे लग्न होणार होते. त्यासाठी ते मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र नशिबाला हे मान्य नव्हते. आगीच्या या दुर्घटनेत हलाई आणि वेकारिया यांच्यासह तीन लोकांचा मृत्यू झाला.


गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी तालुक्याच्या रूपनगर गावाचे सरपंच सुरेश कारा यांनी दिलेल्या माहितीनुसार हलाई, रूपल, त्यांची आई आणि बहीण सांताक्रुझ येथील चार मजल्याच्या गॅलॅक्सी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाल्याने त्यांची व्यवस्था या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.


रविवारी दुपारी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीत किशन हलाई, रूपल वेकारिया आणि कांतिलाल वारा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत रूपलची आई मंजुलाबेन, बहीण अल्पा आणि अस्लम शेख हे जखमी झाले.


काराने सांगितले की हलाई आणि त्याची भावी पत्नी रूपल वेकारिया अनेक वर्षांपासून नैरोबीला राहत होते. अनेक वर्षे परदेशात राहूनही ते आपल्या कुटुंबाशी जोडलेले होते. किशन आणि रूपल यांचा साखरपुडा झाला होता आणि नैरोबीला पोहोचल्यावर ते लग्न करणार होते. तेथे ते आपल्या आई-वडील तसेच बहीण-भावांसोबत राहत होते.


किशन, रूपल आणि त्यांचे कुटुंबीय किशनच्या छोट्या भावाच्या लग्नासाठी एक महिनाआधी भारतात आले होते. नैरोबीला जाण्यासाठी ते सगळे शनिवारी अहमदाबाद येथून मुंबईला पोहोचले. जेव्हा विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाला त्यामुळे विमान कंपनीने त्यांना सांताक्रुझ येथील हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली. या हॉटेलमध्ये रविवारी आग लागली.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार