Nitesh Rane's letter to ATS : संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा

नितेश राणे यांचं एटीएसला पत्र


मुंबई : अयोध्येला तयार होणाऱ्या राम मंदिराविषयी (Ayodhya Ram mandir) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार विरोधी विधाने करत आहेत. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? असा खडा सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरेंचा दंगली भडकवण्याचा इतिहास, पुण्यामध्ये दंगली भडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांची झालेली चौकशी आणि आताही सातत्याने दंगलींविषयी भाष्य करणं असे अनेक मुद्दे उपस्थित करत उबाठा गटाला त्यांनी चपराक लगावली होती. यानंतर आता पूर्वसूचनेनुसार नितेश राणे यांनी एटीएसला संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्याविषयी पत्र पाठवले आहे.


अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी दंगली होणार अशा उबाठा गटाच्या सातत्याच्या वक्तव्यांमुळे नितेश राणे म्हणाले होते की, 'दंगली भडकवण्याची माहिती कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्याने ती संबंधित पोलीस यंत्रणेला द्यावी, अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते. म्हणून उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडे राम मंदिराकडे जाताना दंगल होणार आहे, यासंबंधी कुठलीही माहिती असेल तर त्यांनी ती त्वरित सरकारी यंत्रणेला द्यायला हवी'.


पुढे ते म्हणाले, मीही स्वतः एटीएसला (ATS) पत्र लिहिणार आहे की, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची सखोल चौकशी करा आणि गरज असेल तर नार्को टेस्ट करा अशी मागणी करणार आहे. त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करुन अशा पद्धतीचा कोणताही दंगल घडवण्याचा प्रकार होणार असेल, तर तो थांबवण्याची विनंती या पत्राद्वारे मी सरकारला करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले. त्यानुसार आता नितेश राणे यांनी एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र पाठवले आहे.



काय म्हणाले होते नितेश राणे ?


ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत आहे आणि २०२४ च्या सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येकडे जाणार आहेत, त्यावर उद्धव ठाकरे व संजय राऊत हे दोघेही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, रामभक्तांवर हल्ले होऊ शकतात, अशा प्रकारची विधाने करत आहेत. जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जातात, तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची विधानं ना संजय राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत. पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला मिळत असेल तेव्हाच या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन