मुंबई: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा आज डबलडोस आहे. आज ते रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. तर दुसरीकडे क्रिकेटच्या सामन्याची मजा घेता येणार आहे. आशिया चषक (asia cup) स्पर्धेतील पहिला सामना आज म्हणजेच ३० ऑगस्टला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगत आहे.
या सामन्यासोबतच तब्बल १५ वर्षांनी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे पुनरागमन होतेय. पाकिस्तान क्रिकेटसाठी २००९मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर पाकिस्तानने चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमानपदाचे अधिकार गमावले होते. याशिवाय २०११मध्ये वर्ल्डकपमध्ये संयुक्त यजमानपदही गमावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदस्य देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यामुळे पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आशिया चषकातील हे चार सामने पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे त्यांना २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळू शकते.
३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
३१ ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)
२ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसा)
३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दुपारी १:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)
५ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
६ सप्टेंबर: A1 वि B2, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
९ सप्टेंबर: B1 वि B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१० सप्टेंबर: A1 वि A2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१२ सप्टेंबर: A2 vs B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१४ सप्टेंबर: A1 वि B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१५ सप्टेंबर: A2 vs B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१७ सप्टेंबर: TBC vs TBC, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…