मुंबई : विदर्भातील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतक-यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून आंदोलन (protest) केले. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी या शेतक-यांनी केली आहे.
यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. परंतु उद्यापर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मार्शी येथील तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र तेथे त्यांना न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले. धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…