LPG Gas : घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : सर्वसामान्य गृहिणींना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas) किमती दोनशे रुपयांनी कमी करण्याचा विचार करत आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आघाडीतील विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार आहेत. त्यात केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.


स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला असून उद्यापर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.


भाजप सरकारचे लक्ष्य आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांवर आहे. शिवाय तेलंगना राज्यातही याच वर्षी निवडणूक होणार आहे. त्याचा थेट फायदा व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे या निर्णयामधून दिसून येत आहे.


दरम्यान, मागे एकदा असेच केंद्र सरकार गॅसच्या किमती कमी करणार असून पीएम किसान सन्मान निधीच्या मोबदल्यातही वाढ करणार आहे, असे सांगण्यात आले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. यावेळी सरकार खरंच घोषणा करणार का? हे उद्यापर्यंत कळेलच. पण तसे झाले तर घरगुती गॅस २०० रुपयांनी स्वस्त होईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला