KL Rahul: के एल राहुलने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ची (asia cup 2023) सुरूवात ३० ऑगस्टपासून होत आहे. यानंतर भारतीय संघाला (team india) येथेच वनडे वर्ल्डकप (one day world cup) खेळायचा आहे. मात्र त्याआधी भारताचा स्टार विकेटकीपर केएल राहुलने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. तो नुकताच दुखापतीतून बरा होत परतला आणि त्याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली.


मात्र राहुल अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्याला हलकीशी दुखापत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की केएल राहुल आशिया कपच्या सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळणार नाही. ही माहिती मिळताच चाहत्यांची भीती आणखी वाढली की राहुलची दुखापत वर्ल्डकपचा खेळ बिघडवू नये. वर्ल्डकप ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे.



अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे राहुल


भारतीय संघ आशिया कपच्या सुरूवातीच्या सामन्यात २ सप्टेंबरला पाकिस्तान आणि त्यानंतर ४ सप्टेंबराला नेपाळशी भिडणार आहे. राहुल या दोन्ही सामन्यात संघाचा भाग नाहीये. तो स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये संघासोबत असेल. राहुलची ही दुखापत गेल्या दुखापतीशी संबंधित नाही. राहुल जांघेला झालेल्या दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे.


त्याला जांघेची दुखापत बरी झाल्यानंतर बुधवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात विकेटकीपर फलंदाज म्हणन सामील केले होते. द्रविडने आशिया कपच्या रवानगीआधी पत्रकार परिषदेत सांगितले, केएल राुलने आमच्यासोबत चांगला आठवडा घालवला. तो चांगला खेळ करत आहे. वास्तवात चांगली प्रगती करत आहे.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल