Health Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज, आरोग्य विभागात मेगा भरती

मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने (state government) नोकरीची मोठी सुवर्णसंधी आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य विभागाची (health department) भरती प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आरोग्य विभागात तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.


आरोग्य विभागातील या भरतीसाठीची जाहिरात मंगळवारीच प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२१मध्ये आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवेळेस पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवली गेली होती. त्यामुळे या सरकारवर या भरतीसाठी सरकारवर एकप्रकारचे दबाव होता.


त्यानंतर आता या महायुतीच्या सरकारमध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जे बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.



या पदांसाठी भरती


या भरतीच्या प्रक्रियेत क आणि ड संवर्गातील विविध ६० प्रकारची मिळून एकूण १० हजार ९४९ पदे असणार आहेत. ही प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसकडून राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

Comments
Add Comment

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी