Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर गणेशोत्सवापर्यंत अवजड वाहतुकीला बंदी

मुंबई: गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात (kokan) जाणाऱ्यांची लगबग आता सुरू होईल. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे.


२७ ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यात पळसपे येथे इंदापूर महामार्गाला भेट दिली.


बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार आज म्हणजेच २७ ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजल्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, खालापूर येथील रस्त्यावरून अवजड वाहनांनी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या मार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.


गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम हा कळीचा मुद्दा बनला आहे. पनवेल येथे झालेल्या सभेदरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनीही या मुद्द्याला हात घातला होता. त्यानंतर मनसेकडून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीची तोडफोडही करण्यात आली होती.

Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा