जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीत आलोय - अजित पवार

  194

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची आज बीडमध्ये (beed) जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बीडकरांच्या प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी सभेत बोलताना दिले.शरद पवार यांच्या १७ तारखेला झालेल्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी सरकारी योजनांबद्दलही त्यांनी जनतेला माहिती दिली.



संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय


बीडकरांनी आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. तसेच राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. राजकीय मैत्री जपणारा असा हा बीडचा जिल्हा आहे. समाजकारण आणि राजकारणाची कशी सांगड घालता येते हे बीडकरांनी दाखवून दिलंय. मी येथे संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी दाखवलेला समतेचा मार्ग नक्कीच राज्याला दिशा देईल.


 


राज्यात जातीय सलोखा राहायला हवा


प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात. मात्र त्यातून पुढे जात राहायचं असतं. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मांमध्ये आपण एकत्र असल्याची भावना असली पाहिजे. येथेच राहून जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. बीडमधील पीक विम्याचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. आता १ रूपयांत विमा काढता येणार आहे. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार पैसे भरणार आहे. केंद्राच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.


आम्ही येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. ही पदे केवळ मिरवण्यासाठी नाही. बीडकरांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या येत्या काळातील अधिवेशनात सहा लाखांचे बजेट सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात बीडकरांचे प्रश्न मार्गी लावणार आहे.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या